Shree Kavnai Tirth – Kapildhara Tirth
Kavnai Tirth is 15 km from Igatpuri. It was a very important place in history. The kumbh mela officialy starts from this place. It is believed that by Adeesh from Shri Swami Samartha Maharaj, Shri Gajanan Maharah ( Shegaon) done tapasya for 12 years and then became visible in Shegaon. The great traveller from China Hsuan Tsang ( We have studied in school history) , also visited this place and gave a big circular disk as a present to this place. People can still see this disk inside the temple. There is also a Temple of Kamakshi Devi, which is under renovation. The full area is surrounded by big mountains, Sometime will come in monsoons to visit when there will be lot of greenary.
Also visited, Gatan Devi Mata Mandir, which we usually visits every year in Navratri period. This temple is situated just starting of Ghat reaching to Kasara, thats why the name Ghatan Devi. The new temple was also under renovation.
The serene village of Kavnai, located near Nashik, is home to a cluster of spiritually significant temples that hold deep connections to the Ramayana. Among them is the revered Hindu temple dedicated to Lord Ram and Sita, which exudes an aura of devotion and mythological importance. This temple serves as a gateway to immerse oneself in the timeless tales of the Ramayana, where visitors can feel the presence of powerful souls like Hanuman and Lakshman, whose stories resonate within the temple walls.
In addition to the Ram-Sita temple, Kavnai also houses the sacred Kamakshi Mata Mandir. This shrine is dedicated to Goddess Kamakshi, a form of Parvati symbolizing love, devotion, and compassion. The temple is a beacon of spiritual strength for devotees, with its tranquil surroundings and intricate architecture enhancing the divine experience.
The temples of Kavnai offer a unique blend of history, mythology, and spirituality, making it a perfect destination for pilgrims and history enthusiasts alike. Nestled amidst nature, the peaceful environment allows visitors to reflect and connect with the divine, making every visit a memorable and...
Read more#कावनाईकपिलधारातीर्थ_क्षेत्र #ट्रेक५९ #कामाक्षीदेवी_मंदिर
कावनाई तीर्थ क्षेत्र - एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचेही मानले जाते. तर या स्थानाला चिनी प्रवासी ह्युएनत्संगचाही सहवास लाभला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. येथील परिसरात गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. कावनईचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे कपिलधारा तीर्थ व कामाक्षी मंदिर. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्मध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असल्याचे म्हटले जाते. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे. कावनईच्या राम मंदिरात ह्युएनत्संग (ह्यु-एन-त्संग) या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा आहे. ह्युएनत्संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५ च्या दरम्यान कावनईला भेट दिली होती.
कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन –१. कांचीपुरा, २.गुवाहाटी व ३.करंजगाव (शेगाव).
कावनाई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.
भविकांकडून कामाक्षी देवीच्या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.
कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.
श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण...
Read moreकावनई गजानन महाराजांची तपोभूमी
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. शिवशंकर, पार्वती, कपिलमुनी, श्रीराम, हनुमान, शुक्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. कधीकाळी संख्याशास्त्र अभ्यासासाठी जगभरात विद्यार्थी कावनईच्या गुरुकुलात येत. आता या गुरुकुलाचे अस्तित्व फक्त ह्युएनत्संगने कपिलधारा तीर्थावर भेट दिलेल्या एका अनोख्या घंटेमुळे आठवणींच्या नादांपुरते जाणवते. कावनईची पौराणिक व धार्मिक ओळख अजूनही टिकून आहे, पण गरज आहे ती ह्युएनत्संगने भेट दिलेल्या गावाला संख्याशास्त्र अभ्यासाचे गुरूकुल म्हणून नवी ओळख करून देण्याची.
नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. १८६१पासून इंग्रजांनी कावनईऐवजी इगतपुरीला तालुक्याचे स्थान बनविले, तर १८८५मध्ये इंग्रजांनी कावनईहून सरकारी खजिना इगतपुरीत आणला. सिंहस्थामुळे कावनई तीर्थाचा विकास झाला आहे. महामार्ग ते कावनई रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. येथील पंपासरोवर परिसरात गजानन महाराजांनी बारा वर्षं तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. या केंद्रातून पुन्हा कावनई रस्त्याला लागले की, एक लहानसा घाट लागतो अन् तो ओलांडला की, लगेच कपिलधारा व कामाक्षी मंदिर आपले स्वागत करते. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्मध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी दिलेला ताम्रपट येथे उपलब्ध आहे. आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो, अशी आख्यायिका आहे. याच तीर्थाच्या दक्षिणेला राक्षसांचे गुरू शुक्राचार्यांचा आश्रम होता. त्यांनी दण्डकारण्याला शापित करून येथील निसर्ग नष्ट केला. तो निसर्ग वनवासाला आलेल्या श्रीरामाच्या चरणस्पर्शामुळे पुन्हा हिरवागार झाला. याचे अनोखे वर्णन रामचरित मानसमध्ये वाचायला मिळते. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी एकास मृत मूल जल पाजून जिवंत केल्याची आख्यायिका सांगितली जाते. तसेच या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला. तसेच कावनई गावच्या एकास कुंडातील तीर्थ देऊन कुष्ठरोग बरा केला, असेही म्हटले जाते. संक्रांतीनंतर करी दिनाला ग्रहणांपासून संरक्षणासाठी परिसरातील गावातून नागरिक स्नानासाठी या...
Read more